*काही माणसांच्या डोळ्यात लहान-सहान कारणांमुळे पाणी येतं, ती माणसं कमकुवत नसतात हो...त्यांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसे लगेच हळवी होतात. अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देतील, तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेले अमाप प्रेम हाच असेल. अश्या माणसांना कटू शब्दाने दुखावू नका, त्या अश्रूंचं मोल समजा, जाणीव असू द्या. जगात खूप माणसे तुम्हाला आपलेपणा दाखवतील, पण हळव्या माणसांच्या मनात खरोखर प्रेम असते. ते प्रेम ओळखा आणि लक्षात ठेवा...*
*त्यांच्या अश्रूंना हसण्यावारी घेऊ नका...*
*आरसा आणि मन दोन्ही सारखेच फरक इतकाच आरश्यात सगळे दिसतात, आणि मनात फक्त आपलेच दिसतात...*