‘अमृत’साठी आणखी किती बळी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 5:00 AM
३०२ कोटी रुपयांचा चुराडा अमृत योजनेवर केला जात आहे. लोकांच्या पैशाचा अपव्ययच या योजनेसाठी होत आहे. सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आलेली ही योजना आणखी किमान सहा महिने तरी पूर्णत्वास जाणार नाही, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यकाराची गरज नाही. तरीही कंत्राटदाराला मुदतीवर मुदत वाढवून दिली जात आहे. या याेजनेचा कंत्राट नाशिक येथील पी.एल. आडके या कंपनीला देण्यात आला आहे.